Mandesh Express News
Monday, 16 September 2019
Friday, 24 February 2017
अजित पवार झाले ‘कारभारी’
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे राजकीय वारसदार म्हणून अजित पवार यांच्याकडे पाहिले जाते. नव्वदच्या दशकामध्ये पवार यांनी जिल्हा बॅँकेच्या संचालकपदापासून आपल्या राजकारणाची सुरूवात केली. त्यानंतर लगेचच पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅँकेचे अध्यक्षपद त्यांच्याकडे आले. जिल्हा बॅँकेचे अध्यक्षपद भूषविणारे ते सर्वांत तरुण नेते होते. त्यानंतर पवार यांनी मागे वळून पाहिले नाही. सन १९९१च्या निवडणुकीमध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवून बारामतीमधून विजय मिळविला होता. मात्र त्यानंतर शरद पवार यांनी दिल्लीच्या राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला आणि अजित पवार हे राज्याच्या राजकारणामध्ये रमले. पहिल्यापासून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये त्यांनी रस घेतला होता. त्यांच्या समवयस्क नेत्यांसोबत त्यांनी त्या वेळेस पिंपरी चिंचवड पालिकेची सूत्रे असलेल्या प्रा. रामकृष्ण मोरे यांना शह देऊन स्वतःचा भक्कम गट तयार केला होता. त्या वेळेपासून आजपर्यंत पिंपरी चिंचवड वरील त्यांची सत्ता कायम राहिली.
सन १९९४मध्ये राज्यात शिवसेना व भाजपचे सरकार आले तेव्हा अजित पवार यांना विरोधी बाकावर बसावे लागले. पण तो त्यांच्या उमेदीचा काळ होता. त्याचवेळेस पुण्याची जिल्हा परिषद आणि जिल्हा बॅँक तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सत्तासूत्रेही त्यांच्याकडे आली होती. शरद पवार यांच्याकडेही कोणी गेले तर स्थानिक कामासाठी ते अजित पवारांना भेटा असे सांगण्याची ती वेळ होती. त्यानंतर १९९८मध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसची स्थापना झाल्यानंतर अजित पवार यांना संघटनेमध्येही महत्त्व मिळाले. त्याचा उपयोग त्यांनी राज्यातील आपला संपर्क वाढविण्यासाठी केला. हळुहळू त्यांचा प्रभाव वाढला व पिंपरी-चिंचवड पाठोपाठ पुणे महापालिकेमध्येही त्यांनी तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी यांना आव्हान देण्यास सुरुवात केली होती. सन २००७च्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांनी ‘कलमाडी यांना हटवून पुण्याचा कारभारी बदला’ अशी हाक जाहीर प्रचारात दिली आणि पुण्याने कारभारीपद अजित पवार यांच्याकडे सोपविले. त्यानंतर कॉँग्रेसला बरोबर घ्यायचे नाही, या हट्टापोटी त्यांनी शिवसेना-भाजपसोबत आघाडी करून पुणे पॅटर्न राबवित आपली सत्ता कायम राखली. त्यानंतर पुन्हा कॉँग्रेसला बरोबर घेऊन त्यांनी महापालिकेमध्ये सत्ता मिळविली होती.
Saturday, 18 February 2017
Thursday, 16 February 2017
'शिवसेनेचा व्हिजनऐवजी टक्केवारीत इंट्रेस्ट'
विकासाचा अजेंडा राबवण्याचे काम नागपूर महापालिकेने केले. पण, महापौर आणि स्थायी समिती असूनही मुंबई महापालिकेत पाणी, रस्ते, घनकचरा व्यवस्थापनाबाबत काहीही घडलेले नाही. शिवसेनेला व्हिजन या गोष्टीशी काहीही देणेघेणे नसून त्यांना केवळ टक्केवारी हवी आहे. या टक्केवारीनेच मुंबईचा घात केल्याचा घणाघाती आरोप केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी विलेपार्ले येथील सभेत केला. शिवसेनेस लक्ष्य करताना दर्जेदार रस्ते आणि विकासाची कामे झाली की अधिकारी, नगरसेवक आणि नेते नाराज होत असल्याचा गौप्यस्फोट करत गेल्या २० वर्षांत सेनेने अशी कोणती कामे केली की मुंबईकरांना ती आपलीशी वाटेल, असाही टोलाही त्यांनी लगावला.
शिवसेनेने प्रादेशिक पक्षांबरोबर युती करू असे जाहीर केले आहे, त्याचाही समाचार गडकरी यांनी या सभेत घेतला. तुम्ही मायावती, मुलायमसिंह, ममता बॅनर्जी यांच्या बरोबर जाणार का आणि ते तुम्हाला घेतील का, असा मुद्दा त्यांनी मांडला. युती ही दोन पक्षांची मजबुरी असून दोघांनाही एकमेकांची गरज असते. आमची युती नसती तर तुमचा मुख्यमंत्री झाला असता का, असा सवाल त्यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आरोपांत काहीही तथ्य नसून मी दिलेल्या त्रासाच्या रागापोटी तेव्हाचे मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी नागपूर महापालिकेची चौकशी लावली होती. त्यात देवेंद्र फडणवीस यांचे नाव त्यांनी गुंतवले. पण, देवेंद्र फडणवीस क्लीन असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शिवसेनेने प्रादेशिक पक्षांबरोबर युती करू असे जाहीर केले आहे, त्याचाही समाचार गडकरी यांनी या सभेत घेतला. तुम्ही मायावती, मुलायमसिंह, ममता बॅनर्जी यांच्या बरोबर जाणार का आणि ते तुम्हाला घेतील का, असा मुद्दा त्यांनी मांडला. युती ही दोन पक्षांची मजबुरी असून दोघांनाही एकमेकांची गरज असते. आमची युती नसती तर तुमचा मुख्यमंत्री झाला असता का, असा सवाल त्यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आरोपांत काहीही तथ्य नसून मी दिलेल्या त्रासाच्या रागापोटी तेव्हाचे मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी नागपूर महापालिकेची चौकशी लावली होती. त्यात देवेंद्र फडणवीस यांचे नाव त्यांनी गुंतवले. पण, देवेंद्र फडणवीस क्लीन असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Subscribe to:
Comments (Atom)





